प्रातिनिधी//
३१/५/२०२५
### लोकांचे आरोग्य संकटात, पण सत्ताधारी व अधिकारी मात्र निष्क्रिय – ऑल इंडिया युथ फेडरेशनचा प्रशासनाला जाब
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील गोरगरीब जनता आज मच्छरांच्या भयंकर उपद्रवात सापडलेली आहे. संपूर्ण शहरात गलिच्छ पाण्याचे साठे, कुजलेल्या कचऱ्याचे पसारा, गटारांची सफाई नाही, धुरफवारणी नाही – म्हणजे लोकांच्या जिवाला थेट धोका. डेंग्यू, मलेरिया, अशा साथीचे आजार वेगाने पसरण्याची आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलन्याची शक्यता आहे.
या परिस्थितीला जबाबदार कोण? नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक, आरोग्य विभाग – हे सर्वच भांडवलशाही व्यवस्थेचे पाळीतले लोक आहेत. यांना फक्त खुर्च्या, अधिकार आणि ठेकेदारांची सेवा करायची आहे. गोरगरिब कामगार, आदिवासी जनता, बेरोजगार तरुण यांचं आरोग्य, आयुष्य त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही! याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे:
> “नगरपंचायतीचा हा भोंगळ, भ्रष्ट आणि लोकविरोधी कारभार म्हणजे भांडवलशाही यंत्रणेची नागडं रूप आहे. जनतेच्या पैशावर पोसलेली ही व्यवस्था केवळ दिखावटीची सेवा करते. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना रस्त्यावर उतरून थेट जाब विचारण्याची वेळ आली आहे.”
कॉ. मोतकुरवार यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ठणकावून खालील प्रश्न उपस्थित केले:
* मच्छरांचा प्रादुर्भाव एवढा वाढूनसुद्धा धुरफवारणी का केली जात नाही?
* स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च दाखवले जातात, पण प्रत्यक्षात गटारे भरलेली का आहेत?
* नागरिकांच्या तक्रारींचं काय होतं? त्यावर कोणती कार्यवाही होते?
* नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कोणाचं नियंत्रण आहे? की तेही सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने मनमानी करत आहेत?
### एटापल्लीतील जनता यांना माफ करणार नाही!
कोणताही सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, मालक नाही. एटापल्लीतील सध्याची आरोग्यदायी आपत्ती ही यंत्रणेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे.
“आम्ही स्पष्ट सांगतो – ही झोपलेली, भ्रष्ट व्यवस्था जर लगेचच जागी झाली नाही, तर ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने जनता रस्त्यावर उतरेल. आम्ही या लढ्यात कामगार, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला यांना घेऊन निर्णायक आंदोलन उभारू,” असा थेट इशारा कॉ. मोतकुरवार यांनी दिला.
निधी आली पण काम कधी होणार याची चर्चा मात्र जोमात सुरू?
आमच्या पुढील मागण्या…..
1. नगरपंचायत क्षेत्रात तातडीने संपूर्ण धुरफवारणी मोहीम चालवा.
2. संपूर्ण परिसरातील नाल्यांची आणि गटारांची सफाई युद्धपातळीवर करा.
3. भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करा.
4. नागरिकांसमोर पारदर्शक अहवाल सादर करा – कोणाला किती कामाचे पैसे दिले आणि काय काम झाले?
“जनतेच्या पैशातून पोसलेली ही व्यवस्था जनतेलाच मारू पाहत असेल, तर आम्ही ती मोडून काढल्याशिवाय थांणार नाही!”
कॉ. सचिन मोतकुरवार
राज्य उपाध्यक्ष
ऑल इंडिया युथ फेडरेशन
—