*राजाराम,*
, ग्रामपचायत राजाराम येथील मेन चौकातील रोडचा बाजूने किमान दोन ते तीन वर्षे लोटली तरी सुद्धा या कचराकुंडी सफाई करण्यात येत नाही. या कचराकुंङी सफाई करायला सांगितले असता,निधी येऊन आहे पण करण्यास कोणी नाही असे सांगतात त्या नंतर कुणाचेही लक्ष नाही असे स्पष्ट दिसते आहे. आता पावसाळा सुरू होत असल्याने सदर नाल्यांची सफाई करुन द्यावी अशी मागणीही नागरिकाकडून करण्यात आली आहे पावसाळ्यात पाणी साठा होईल त्यात घान कचरा व मछर जमा होतील आणि नागरीकांना त्रास निर्माण होईल त्यामुळे ग्रामपचायत या नाल्यांची लवकरात लवकर पूर्ण सफाई करण्यात यावे असे मत व्यक्त केले जात आहेत.
ग्रामपचायत एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं आणी सफाई कामगार लावू लगेच पाउस सुरु होण्यापूर्वी सफाई करुन द्यावी,
वर्ष भरातून नागरिकांना बिल्चिगं पावडर दोन ते तीन दा द्यायला हवे परंतु वर्ष भरात फक्त एकदाच भेटते बाकीचे पावडर जाते तरी कुठे असा नागरीकांना प्रश्न पडतो..
नागरीकांच्या म्हणणे आहे की या नाल्यांची सफाई करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.