#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनाधी//
भाग्यश्री ताई आत्राम यांचा पुढाकार
अहेरी:सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा आणि तेकडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाची बस सेवा बंद असल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.दरम्यान नागरिकांची अडचण लक्षात घेता माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी अहेरी आगार प्रमुखाकडे या गावांसाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती.त्यासाठी त्यांनी अहेरी आगारात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनही दिले होते.अखेर सिरोंचा-तेकडा- रेगुंठा-अहेरी बस सुरू करण्यात आले असून या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील देवलमरी,आवलमरी,लंकाचेन,मोयाबिनपेठा,रेगुंठा,पर्सेवाडा,तेकडा,कंबालपेठा या गावांतील नागरिकांना तालुका मुख्यालय जाण्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता.मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांकडून एसटी बसची मागणी केली जात होती.यासाठी भाग्यश्री ताई आत्राम यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे मागणी करताच अखेर अहेरी आगार प्रमुखांनी अहेरी ते सिरोंचा साठी यामागे बस सुरू केली.
8 फेब्रुवारी रोजी एसटी बस गावात दाखल होताच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस आणि वाहन चालक व वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ही बस अहेरी आगारातून सायंकाळी 5 वाजता देवलमरी मार्गे रेगुंठा-तेकडा-कंबालपेठा मार्गे सिरोंचा कडे जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सिरोंचा वरून याच मार्गे अहेरी कडे येते.परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार एसटी बस दाखल झाल्याने नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.