अहेरी येथील पाणी समस्येबद्दल विचारला जाब जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी केली चर्चा

81

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*अहेरी :-* अहेरी शहरातील अस्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे भाग्यश्री ताई आत्राम यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन गढुळ पाण्याची समस्या तत्काळ निकाली काढण्याबाबत जाब विचारला.अहेरी शहरात किमान सहा महिन्यांपासून सतत अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत नेहमीच ओरड सुरु असते. खंडीत पाणी पुरवठा, अपुरा पुरवठा, कमी दाब, अस्वच्छ अथवा घाण पाणी अशा असंख्य तक्रारी प्राधिकरणाच्या बाबतीत सतत सुरू असतात. परंतु जीवन प्राधिकरणावर नगर पंचायत प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी केली चर्चा. प्राधिकरणच्या अधिका-यांशी चर्चा करुन गढुळ पाण्याची समस्या तात्काळ निकाली लावण्यासंबंधी सूचना केली. प्राणहिता नदीचे पाणी प्रक्रिया करुन अहेरी शहराला पुरविल्या जाते. परंतु जेव्हा जेव्हा धरणातील साचलेले पाणी सोडण्यात येते, तेव्हाच हिरव्या रंगाचे पाणी शहराला मिळते. तुरटीने गाळ बसविणे व क्लोरीन, ब्लिचींग व तत्सम रसायनांमार्फत निर्जंतुकीकरण करणे एवढेच शासनाचे मार्गदर्शक तत्वे असतात. त्यानुसारच काम सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले. या प्रक्रियेमार्फत निर्जंतुक पाणी पुरवता येते. परंतु पाण्याचे रंग बदलुन देण्यासाठी काहीही सुविधा नसल्याची कबुली अधिका-यांनी दिली. नागरिकांना अपायकारक पाणी पुरवठा झाल्यास पुन्हा मोठे आदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे भाग्यश्री ताई आत्राम, जहीर भैया हकीम, अमोल मुक्कावार नगरसेवक अहेरी, अफसर खान,मिलिंद अलोने,सुमित मोतकुवार , अनुराग बेजलवार, राहुल दुर्गे, अमोल रामटेके, व असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.