एटापल्ली, १० जून – भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) आणि त्याच्या जनसंगटनांमध्ये एटापल्ली तालुक्यात गेल्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण नेमणुका करण्यात आल्या असून, यामुळे चळवळ अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तेजस गुज्जलवार आणि अश्विनी गुज्जलवार यांनी भाकपामध्ये अधिकृत प्रवेश घेतला असून, त्यानंतर तेजस गुज्जलवार यांची भाकपा एटापल्ली शहर सचिवपदी, तर अश्विनी गुज्जलवार यांची भारतीय महिला फेडरेशन (NFIW) तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी त्यांना भाकपा जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. दोघांनाही क्रांतिकारी शुभेच्छा देत कॉ. मोतकुरवार यांनी सांगितले,भाकपा ही फक्त एक राजकीय संघटना नसून लोकशाही मार्गाने जनतेच्या समस्याला लढा देणारी एक जनतेची चळवळ आहे तेजस आणि अश्विनी यांच्यामुळे गरीब, शेतकरी, शोषित, वंचित, महिलांचा संघर्ष अधिक मजबूत करण्यास पाठबळ मिळेल आणि अश्या प्रकरच्या “तरुण कार्यकर्ते आणि महिला नेतृत्व हे आमच्या पक्षाची खरी ताकद आहे. एटापल्ली शहरात क्रांतीची मशाल अधिक तेजाने जळेल आणि आपल्या नावासारखा लोकांच्या जीवनात तेज प्रकाश देईल अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वीच कॉ. राजेश हजारे यांची AIYF तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
या सलग नेमणुकांनी एटापल्ली तालुक्यातील भाकपाची संघटना अधिक मजबूत होत असून, शहर व ग्रामीण भागातील जनतेत नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे…..