प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क
#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime
एटापल्ली: एटापल्ली ते चोकेवडा मार्गावरील डांबरीकरण चे काम कासव गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असून नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे आहे तरी या मार्गाचे डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे या रोडचे काम गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू असेल तरी मंद गतीने चालू आहे हा रोड छत्तीसगडला जुळलेला असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने वाहतूक सुरू असुन या मार्गावर चार चाकी अवजड वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवतात रस्त्याच्या एका बाजूने चालत असलेल्या दुचाकी वाहन चालकांना या अर्धवट भागामुळे आपले वाहन रस्त्याच्या मध्यभागी चालवावे लागते या मार्गावर या ठिकठिकाणी गिठी टाकून ठेवण्यात आले आहे त्यातच सतत धूळ उडत असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही दुचाकी चालकांमध्ये अपघाताचा धोका नेहमीच असतो यासोबत हा मार्ग खडबडीत असल्यामुळे वाहन चालकाचे संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारली जात नाही अशा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही येतील नागरिक विचारत आहे रोड लोलारणे पाणी न टाकता दाबई केली जात आहे तीन दिवसाला एक टँकर भरून पाणी आणतात आणि टाकतात आणि पूर्ण रोडला टाकलेली गिट्टी उध्वस्त होत आहे याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे रोज ह्या रोड ला गाड्या फसतात फसलेली गाडी काढण्या करिता ट्रॅकटर ला ५०० रुपये मोजावे लागतात