अहेरी: जवळील प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते अहेरी मुख्य चौक या रस्त्याच्या डांबरीकरनाचे उद्घाटन होऊन तीन महिन्यांच्या काळ लोटला आहे.मात्र संबंधित कंत्राटदाराणे टाकलेली गिट्टी परत उचलली व अद्याप एका साधा खड्डा सुद्धा बुजविला नाही आणि रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही सुरू केले नाही त्यामुळे येत्या सात दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिध्दी पत्रकातुन केला आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरण आणि डांबरीकरणाचे उद्घाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले होतें मात्र कामाला सुरुवात झाली नाही.
अहेरी ते प्राणहिता पोलीस उपमुख्यालया पर्यंत हजारो खड्डे पडले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबधीत कंत्राटदाराला ताकीद दिली नाही आणि रस्त्याचे काम सुरू केले नाही.सध्या आंचारसंहिता सुरू आहे मात्र कामाचे उदघाटन होऊन तीन महिने झाले.
सामान्य नागरिकांना या रस्त्याचा खूप त्रास होत असून खड्यामुळे दुचाकी चारचाकी खराब होत आहे लोकांना विविध आजार जडत आहे.खड्ड्यामुळे अपघात ही होत आहे त्यासाठी संबंधित कंत्राटदार हा जबाबदार आहे त्यामुळे येत्या सात दिवसात रस्त्याचे डांबरीकरण,नूतनीकरण सुरू झाले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसणार असे संतोष ताटीकोंडावार यांनी सांगितले आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा ईशारा दिल्याने प्रशासन काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.