अहेरी ;-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आज इंडियन दस्तक न्यूज चॅनेल चे उदघाटन करण्यात आले
या वेळी त्यांनी आपल्या शुभ हस्ते रिबीन फित कापून शुभारंभ केला
या वेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे की पत्रकारिता जनकल्याणासाठी गोर गरीब जनतेच्या समस्या शासनाच्या दरबारी पोहोचवून शोषित पीडित वंचितांचा आवाज बनून गरजला पाहिजे
लोकशाही वाचवण्यासाठी आज पर्यंतचा काळात पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे समोरची लोकशाही टिकवायची असेल तर पत्रकारिता ही निष्पक्ष असली पाहिजे कोणत्याही आमिषाला बडी न पळता सत्यतेकडे मार्गक्रमण केले पाहिजे या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क चे संपादक सुरेश मोतकुरवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहो अशी ग्वाही दिली या वेळी
नरेंद्र गर्गम प्रमोद गोडशेलवार विशाल वाडके विणेश भोयर अर्जून परकिवार इंशात दाहगांवकर व अजय मित्र परिवारचे कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते,