अमच्या गावाला रस्ता दया हो शेवारी गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी संदीप कोरेतला गाव वासियांचे साकडे

92

एटापल्ली: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन एक वर्ष लोटून गेला तरी शेवारी गावातील गावात यासाठी रस्त्यासह मूलभूत गरजा अजून पूर्ण न झाल्यामुळे ग्राम वासियानी गावात मीटिंग घेऊन त्या मीटिंग मध्ये शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांना पाचारण करून त्यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री व सह पालकमंत्री यांच्याकडे गावातील समस्या सोडविण्यासाठी निवेदनातून मागणी केली आहे
एटापल्ली तालुक्यातून ५०किलो मीटर अंतरावर असणाऱ्या अती दुर्गम भागात मोडल्या जाणाऱ्या सेवारी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील विकासाला ब्रेक लागला असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत
एटापल्ली ते कसनसूर पर्यंत डांबरीकरण मार्ग आहे पण नंतर कसनसूर ते सेवारी साठी रस्ता नसल्याने या गावात बस येत नाही त्यामुळे शाळकरी मुलांना तसेच गरोदर माता असो की आजारी माणसाला दवाखान्यासाठी तालुका मुख्यालयी घेऊन जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन ताऱ्यावरची कसरत करावी लागते त्याच प्रमाणे गावातील विद्युत खांब हे शोभेचे वस्तू बनून उभे आहे कारण महिन्यातून सात ते आठ दिवस मोठ्या मुश्किल ने राहते रात्रीचे जेवण मेणबत्ती किंवा टीम टीम लावून करा लागते लाईट नसल्यामुळे रात्री पंखे बंद असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे स्थानिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचप्रमाणे लाईट नसल्यामुळे मोबाईल ला नेटवर्क राहत नाही त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांना, व महिलाना शासकीय दाखले व सरकारी योजना पासून वंचित रहावे लागत आहे त्यामुळे सेवारी ग्राम वासियाना रस्ते, वीज, नेटवर्क व मूलभूत गरजा व समस्या सोडविण्यासाठी निवेदनातून शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांच्या मार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री व सह पालकमंत्री यांच्याकडे केली मागणी करण्यात आली तेव्हा गावातील प्रतिष्ठितदेवराव माहुर्ले कपिल लोहबल नीलकंठ वाडई राजू लेनगुरे संपत् लोहबल अरुण लेनगुरे भास्कर लेनगुरे स्वप्निल लेनगुरे पुंजराम माहुर्ले रावजी कावडे जगनाथ निकोड़े उमेश गवातुरे प्रकाश माहुर्ले अजय गावटुरे तसेच गावातील असंख्य लोक उपस्थित होते
*सहपालकमंत्री ना समस्यांचा पाठ पुरावा करून समस्या सोडविणार #संदीप कोरेत*
सेवारी गावातील समस्या गंभीर आहे व तुमची मागणी रास्त आहे स्थानिक लोक प्रतिनिधींचा नाकर्तेपणा मुळे या समस्या उद्भवल्या आहेत तरी तुमच्या समस्याचा पाठ पुरावा जिल्ह्याचा सह पालकमंत्री यांच्याकडे कडून ते लवकरच सोडविणार असे गावकऱ्यांना शब्द देऊन आश्वस्त केले