मेळघाटमधील विस्थापित गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने महाराष्ट्रभर आंदोलन – राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रपतींना निवेदन

135

प्रतिनिधी//

गडचिरोली:- राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना आंदोलन करून निवेदन देण्यात आले . हे आंदोलन महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यात करण्यात आले . अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पासाठी गुल्लरधाट , केलपानी , सोमठाणा खुर्द , सोमठाणा बु. ,धारगड , नागरतास , आमोना , बारुखेडा ही आठ आदिवासी गावे २०११ पासून विस्थापित करण्यात आली . अजूनही या गावांना मुलभूत सुविधा उदा . अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण , आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आली नाही . त्यांना जल ,जंगल , जमीन , कला , सभ्यता , संस्कृती , रितीरिवाज इत्यादि पासून वंचित करण्यात आले . अनेकदा धरणे, आंदोलन , प्रदर्शन , निवेदने देऊन शासन फक्त आश्वासन देतो .परंतू मागण्या पूर्ण केल्या नाही .
त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत . पुनर्वसीत केलेली गावे अनुसूची ५वी व ६ वी मध्ये टाकण्यात यावे . जेणेकरून त्यांची कला , सभ्यता , संस्कृती , रितीरिवाज कायम राहतील . जेवढी गावठाण क्षेत्र , चराई क्षेत्र , जमीन, घरे , प्रकल्पात गेले तेवढी क्षेत्रे व नुकसान भरपाई करून द्यावे . त्यामुळे पुढील काळात त्यांच्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाह त्यावर चालेल .
या मागण्या पूर्ण न केल्यास ६ जूनला विभागीय आयुक्तालय अमरावती येथे महाराष्ट्रातील कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत .
निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा प्रभारी जयंत गेडाम , प्रमोद राऊत जिल्हा प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा , नरेंद्र शेंडे सचिव बहुजन मुक्ती पार्टी , शांतीलाल लाडे उपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी , संघटनेचे कार्यकर्ते जैराम उंदिरवाडे , दामोधर शेंडे , शांतीलाल लाडे , प्रेमदास रामटेके , मुकुंदा उंदिरवाडे , प्रियंका गेडाम , डोमाजी गेडाम , श्रीरंग उंदिरवाडे , तुळशिराम सहारे उपस्थित होते .