३ मे २०२५ शनिवारला शेतकरी परिषद

89

प्रतिनिधी// रूपेश सलामे

:- राष्ट्रीय किसान मोर्चा ची शेतकरी परिषद ३ मे २०२५ शनिवारला सायं . ५.३० वाजता लुंबिनी बुद्ध विहार पारडी कुपी येथे आयोजित करण्यात आली आहे . राष्ट्रीय किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा. दिपक इंगळे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे उदघाटक मा . मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष आरपीआय आहेत . शेतकऱ्यांना रास्त भाव न देणे , शेतीला २४ तास मोफत विज न देणे , शेती विज बिलांचा हजारो कोटींचा घोटाळा करणे इत्यादि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
या शेतकरी परिषदेत हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे जयंत गेडाम जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा व भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष यांनी कळविले आहे .