ग्रामीण भागात खेळांचे स्पर्धा म्हणजे एक प्रकारचे गावात उत्सवच- संदीप कोरेत सिंधाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

105

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:- ग्रामीण भागात खेळाला अति महत्व आहे परंतु प्रत्येक गावात मैदान नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू आपली खेळ-कला सादर करू शकत नाही आहेत म्हणून ग्रामीण भागात खेळांचे स्पर्धे आयोजित करून ग्रामीण भागातील खेळाडु आपल्या शक्तीने आपली व्यासपीठ निर्माण करावे तसेच ग्रामीण भागातील गावामध्येखेळांचे स्पर्धा आयोजन करणे म्हणजे गावात एक प्रकारचे उत्सवच होय असे प्रतिपादन मनसे चे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले.
जिमलगठ्ठा जवळील सिंधाटोला येथे जयसेवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी गावात आदिवासी पारंपरिक वाद्य ढोल वाद्याने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गाव पाटील चिन्ना वेलादी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, वसंत डुरके,श्रीनिवास जव्वा, मुन्ना झाडे, संदीप चंदावार, बंडू वेलादी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संदीप कोरेत म्हणाले की,ग्रामीण भागात खेळाला महत्त्व असून ग्रामीण भागातील युवकांमध्ये खेळ कला असून ते कला समोर आणण्यास प्रत्येक गावात क्रीडा स्पर्धा आयोजन करावे. सिंधा टोला या गावात पहिल्यांदा व्हॉलीबॉल सामन्याचे स्पर्धा आयोजित केले असून दरवर्षी खेळाचे आयोजन करण्यास मी सहकार्य करिन असे सिंधा टोला वासीयांना आस्वासित केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वेलादी तर सूत्रसंचालन वेलादी व आभार प्रदर्शन सुनीता वेलादी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता जय सेवा ,जय जोहार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण व गावातील क्रीडा प्रेमी युवक वर्ग सहकार्य केले.