नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा. – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन #jantechaawaaz#news#portal#

105
प्रतिनिधी//
आलापल्ली येथील वार्ड क्रमांक ०६ मध्ये नाल्याच्या पुरामुळे अनेकदा नुकसान झाले.त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याची दिशा बदलवण्याची मागणी वार्ड क्रमांक ०६ मधील नागरिकांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदनातून केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आलापल्ली येथील ४० वर्षापासून स्थायी रहिवाशी आहोत. आमच्या वार्डा लगत नाला असून दिवसेंदिवस येणाऱ्या पुरामुळे या नाल्याचे पात्र विस्तारत आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याला येणाऱ्या पुरामुळे आमच्या वार्डात व घरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घरातील साहित्य, जनावरे धान्य व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसाना पासून वाचण्यासाठी वन विभागाकडून नाल्याची दिशा बदलून देऊन प्रवाह दुसरीकडे वळवावा. त्यामुळे या वार्डातील घरांचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही. यावेळी निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य विजया विठ्ठलानी, सुरेखा सॅन्ड्रा,संगीता कोहपरे
,सुरेखा धानोरकर,सावित्री भिमोजवार, सुनंदा भीमनपल्लीवार,बंडू धानोरकर, शकुंतला श्रीरामवार,सुशीला आत्राम,माया बासनवार,सोनी मडावी, बानू आत्राम,रामबाई शिवनेरी, रीना रास पुडीवार, इंद्रायणी बोमेनवार,सुरेखा येरमे, रवी रासपुडीवार,मनीषा सॅन्ड्रा, सरिता बंडावार आदी उपस्थित होती