वेलगुर,किष्टापूर ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचे भूमिपूजन मोठी निधी मिळाल्याने गावागावात आनंदाचे वातावरण

87

अहेरी:-तालुक्यातील वेलगुर,किष्टापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांमध्ये लाखोंच्या निधीतून विकास कामे केली जाणार आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

मागील काही दिवसापूर्वी या दोन ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावातील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे विकास कामांची मागणी करत यादी दिली होती.परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार गावात विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हाव,गावांचा विकास व्हावं या उदात्त हेतूने माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निधीची मागणी रेटून धरली.अखेर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिले असून या भागात मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केली जाणार आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार आणि कार्यकर्त्यांनी या दोन ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत भेटी देऊन विकास कामांचे भूमिपूजन केले.यावेळी किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी, उपसरपंच पवन आत्राम,नगरसेवक श्रीनिवास चटारे,मखमुर शेख,हनमंतु आडे, दिलीप सोनूले, तसेच किष्टापूर, नवेगाव,वेलगुर,शिवलिंगपूर,तानबोडी आदी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*तालुका अध्यक्षांना मिळाला भूमिपूजनाचा बहूमान*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी वेलगुर आणि किष्टापूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये जवळपास एक कोटी रुपयांची निधी दिली असून येथील विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,नगरसेवक श्रीनिवास चटारे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना बहुमान दिला हे विशेष.