*सुरजागड लोह प्रकल्प संदर्भात गडचिरोली येते उद्या होणारी जनसुनावणी रद्द करून तालुका स्थळ एटापल्ली येते घेण्यात यावे..*

54

*उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची निवेदनाद्वारे मागणी.*

*पाठविलेले निवेदन..*

*प्रती,*
*मा.देवेंद्रजी फडणवीस*
*उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा..!!*

*विषय- सुरजागड लोह प्रकल्पा संदर्भात २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येते होणारी जनसुनावणी रद्द करून तालुका स्थळ एटापल्ली येते घेण्याबाबत..!*

     एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाची उत्कनन क्षमता ३ दशलक्ष टन प्रतीवर्ष वरून १० दशलक्ष टन प्रतिवर्ष करण्याचा वाढीव प्रस्ताव कंपनीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे, ह्या संदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी येत्या २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येतील जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले आहे, नियमानुसार ज्या एटापल्ली तालुक्यात तो लोहप्रकल्प आहे त्या ठिकाणी ही जनसुनावणी घेणे अपेक्षित आणि जनतेसाठी सोयीचे असतांना तसे न करता मुद्दामहून जिल्हा प्रशासनाने गडचिरोली येते सदर जनसुनावणी ठेवल्याने स्थानिक अनेक नागरिक ह्या जनसुनावणी पासून वंचित राहू शकतात, तसेच ह्या जनसुनावणीची प्रसिध्दी स्थनिक वृत्तपत्रात तसेच इतर माध्यमातून न झाल्याने ह्या जनसुनावणी बाबत अनेकांना माहिती ही मिळालेली नाही,त्यामुळे बहुतांश स्थनिक नागरिक गडचिरोली येते अनुपस्थित राहू शकतात तसे झाले तर आपले मनने ते सदर जनसुनावणी दरम्यान मांडू शकनार नाही.
   वाढीव १० दसलक्ष टन प्रतिवर्ष उत्कनन क्षमता झाली तर सुरजागड प्रकल्प परिसरातील १३ गावांना त्यांच्या धोका निर्माण होहू शकतो तसेच सद्या सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून, अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, स्थानिक बेरोजगारांना नौकरी नाहीच्या बरोबरीने मिळालेली आहे, तसेच प्रदूषण ही नियंत्रनाच्या बाहेर गेले आहे,त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये सुरजागड लोह प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजी आहे, ही जनभावना विचारत घेऊन वाढीव उत्कननाला वरील सर्व समस्या मार्गी लागत पर्यंत कृपया मान्यता देऊ नये.
  सुरजागड लोह प्रकल्पाबाबतीत गडचिरोली येते २७ ऑक्टोबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द करून एटापल्ली ह्या तालुका स्थळी ती जनसुनावणी घेण्यात यावी तसेच ह्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात व इतर माध्यमातून व्यापक  प्रसिद्धी करण्यात यावी, ही अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची मागणी कृपया आपण विचारात घेवून योग्य तो निर्णय घ्यावा ही आपणांस नम्र विनंती आहे..