#Accident गडचिरोल्ली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपघाताग्रस्ताला केली आर्थिक मदत.

59

वेलगुर जवळ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 2युवकांचे मृतदेह मराठवाडा पाठविण्यास







         अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काल दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले होते, मराठवाडा येतील नांदेड आणि परभणी येतील सदर २ युवक चार महिन्यापूर्वीच कमलापूर पोस्ट ऑफिस मद्ये पोस्ट मास्टर आणि पोस्टमन मनुन रुजू झाले होते, ते २ दिवसीय प्रशिक्षण घेण्यासाठी दुचाकीने गडचिरोली येते मूलचेरा मार्गाने जात असतांनाच हा दुर्दैवी अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.











         ह्या २ युवकांचे मृतदेह स्वगावी नांदेड आणि परभणी नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पैशांची गरज आहे हे माहीत झाल्यावर गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी २५,०००/- पंचवीस हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत केली, तसेच ह्या दुःखद प्रसंगी त्यांचा कुटूंबियांचे सांत्वन करीत, मृतदेह मराठवाडा नेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना ह्यावेळी दिले..