विद्युत वितरणाचा भोगस कारभारामुळे नागरिक त्रस्त साहेब लाईट कधी येणार असा विचारल्यास आमच्या कम्पलेट करा जास्तीत जास्त का कराल बदलीच कराल ना

101

प्रतिनिधी//

जिमलगट्टा विभागीय अंतर्गत येत असलेल्या रेपणपल्ली, कमलापूर, छल्लेवाडा, राजाराम, गुड्डीगुडम परिसरात सातत्याने विजेचा लंपडावं सुरु होत असतो तीनही ऋतुत कुठे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असते तर कुठे दिवसेंदिवस बत्ती गुल होत असते.
पाऊस असो किव्हा नसो, नेहमीच विजेचा लपंडाव होत असतो.
बिल मात्र दर महिन्याला घेत असतो.नाहीतर मिटर कापणार असे वाक्य संबंधित विद्युत विभागाचे कर्मचाऱ्यांकडून मिटर धारकांना बोलले जात असते.आणि फाल्ट मिटर चा बिल मात्र गगनात मावेल इतका रिडींग न घेता पाठविले जात असतो.
घनदाट जंगलाने व्याप्त परिसर असून पावसाळ्यात रात्री जंगली प्राणी व सरपटनारे प्राणी निघण्याची दाट शक्यता असते.त्या पासून नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण होते.
या परिसरात धानाचे मिल,झेरॉक्स मशीन, ऑनलाईन कामे,शासकीय कार्यालय असून विद्युत पुरवठा मुळे अनेक कामे खोळंलबी जातात व वेळेवर कामे होत नाही. शाळे महाविद्यालये सुरू होणार आहेत त्या करिता विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्रे काढण्यास ही विलंब विद्युत पुरवठा मुळे विलंब होत आहे.
त्या करिता विद्युत पुरवठा विभागाने जातीने लक्ष देऊन नियमित पुरवठा करावी अन्यथा विद्युत विभाग कार्यालयावर धडक देणार.

*रिडींग न घेता बिल*

प्रत्येक महिन्यात युनिट रिडींग घेऊन बिल पाठविण्याऐवजी एक सरासरी अंदाज घेऊन भरमसाठ बिल पाठवीत आहेत व वसुली करीत आहेत.