दि. ०७ एप्रिल २०२३
कुरखेडा:
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी किर्तन प्रबोधनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून मनुष्याची मन बदलून सत्याच्या मार्गाने मनुष्य जीवनात परिवर्तन केले पाहिजे परंतु आज जग बदलत आहे संस्कृती बदलत आहे या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आजच्या काळात सुद्धा कीर्तन प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले. कुरखेडा
तालुक्यातील घाटी येथे सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या भव्य जाहीर कीर्तनात उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटनीय मार्गदर्शन केले
*यावेळी अध्यक्ष भाजपा ज्येष्ठ नेते सहकर महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, सहउद्घाटक आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, माजी जिल्हा उपाध्यक्ष जिवन पाटील नाट, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रवींद्र भाऊ गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश भाऊ वालदे, प्रा. डॉ. नरेंद्र पाटील आरेकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष पंकज भाऊ खरवडे, शिवसेना तालुकाप्रमुख
आशिष भाऊ काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम, महादेव पाटिल नाकाडे, सरपंच मोहिनी गायकवाड, उद्धव गाहने व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*यावेळी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार कृष्णा गजबे यांनी समाज प्रबोधन किर्तनात मार्गदर्शन करतांना सांगीतले कीर्तनातून माणसाचे आचार विचार हे शुद्ध होत असतात व कीर्तनातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते असे विचार व्यक्त केले.*
*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार ,आमदार कृष्णा भाऊ गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे, आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते सुरेंद्र सिंह चंदेल,प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर,यांनी उपस्थित समस्त कीर्तन प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांना प्रामुख्याने मार्गदर्शन केले
*सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन पर कीर्तन ऐकण्यासाठी जिल्हाभरातील विविध तालुक्यातील हजारो नागरिक कीर्तन प्रेमी बंधू भगनीनीं कीर्तन ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येत उपस्थित होते.*