एटापल्ली पोलिसांची मोठी कारवाई; सात किलो गांजासह दोघे आरोपी अटकेत

806

*एटापल्ली*

दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी एटापल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत QRT एटापल्लीच्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत सात किलो गांजा जप्त केला.

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वारांनी संशयास्पद हालचाल करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश कडव व त्यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. विचारपूस करताना आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांच्या बॅगेची झडती घेण्यात आली. झडतीत सात किलो गांजा मिळून आला,जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्धेमाल आहे

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर, पोलीस उपनिरीक्षक साखरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश कडव, QRT जवान, पोहवा भिवा हिचामी, पोलीस शिपाई मोहन शिंदे व चालक पोलिस हवालदार गावडे यांच्या संयुक्त पथकाने एटापल्लीतील अंडा चौक येथे केली.

गांजा जप्त करून एटापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी सतीश मंडल व मिथुन जयदार हे पाखंजूर (जिल्हा कांकेर, छत्तीसगड) येथील रहिवासी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गांजा विक्री बंदी असूनही आरोपींनी तो बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर करीत आहेत.